back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध-रोहिणी खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rohini Khadse ; सावदा (साक्षीदार न्युज ) ; – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या रावेर तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी सुनोदा येथे शेतात झाडाखाली बसलेल्या शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांची उपलब्धता, केळी पिक विम्याची प्रलंबित नुकसान भरपाई, शेती पंपांचा विद्युत पुरवठ्याविषयी येणाऱ्या समस्या रोहिणी खडसे यांच्याकडे मांडल्या.

- Advertisement -

यात सध्या पूर्वहंगामी लागवड केलेल्या कपाशी व पेरणी बरोबर इतर पिकांना रासायनिक खते देणे सुरू असून कृषी विभाग मुबलक खते उपलब्ध असल्याचे सांगत आहे परंतु सद्यःस्थितीत युरिया व 10:26:26 ही खते शेतकरी बांधवांना उपलब्ध होत नाही. मिळालेच तर त्यांची लिंकिंग सुरू आहे किंवा शेतकऱ्यांना चढ्या दरात ही खते घ्यावी लागत आहेत.

जळगाव जिल्हयात एप्रिल व मे महिन्यात उष्णतेने कहर केला. एप्रिलमध्ये अनेक दिवस ४२ अंश सेल्सिअसवर तापमान होते. तर मे महिन्यातही अनेक दिवस ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान होते. त्याकारणाने अतिउष्णतेने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे फळ पीकविमा योजनेतून २०२३-२४ च्या हंगामात केळी पिकासंबंधी विमा संरक्षण घेतलेल्या विमाधारक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४३ हजार ५०० रुपये एवढी विमा भरपाई देय आहे परंतु अद्यापही ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. तसेच वादळामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळालेली नाही, भारनियमनामुळे पिकांना पाणी देण्यास अडचणी येतात महावितरण भारनियमन वेळेव्यतिरिक्त अवेळी विद्युत पुरवठा बंद करते त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही अशा अनेक समस्या शेतकरी बांधवानी रोहिणी खडसे यांच्याकडे मांडल्या.

- Advertisement -

त्यावर रोहिणी खडसे यांनी शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच जळगाव जिल्हाधिकारी आणि जळगाव जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेऊन केळी पिक विमा आणि रासायनिक खतांच्या उपलब्धतेविषयी व इतर समस्यांविषयी त्यांना अवगत करून, त्या सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे शेतकरी बांधवांना आश्वस्त केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमी शेतकरी बांधवांच्या पाठीशी असल्याची व वेळप्रसंगी शेतकरी बांधवांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याची रोहिणी खडसे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना ग्वाही दिली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटिल, निंभोरा सरपंच सचिन महाले, गणेश देवगिरीकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS