साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | जगभरात ज्या वेळेची गेल्या अनेक महिन्यापासून आतुरतेने वाट पाहिली गेली होती. तो क्षण अखेर आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याला प्रारंभ झाला असून या सामन्यापूर्वी टॉस करण्यात आला. हा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना दिसून येणार आहे.
या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिला तर,या संघाने १९ सामने खेळले आहेत.यापैकी भारतीय संघाला ११ सामने जिंकता आले आहेत. तर ८ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावर भारतीय संघाची विजयाची सरासरी ५७.८९ इतकी राहिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने या मैदानावर ६ सामने खेळले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाला ४ सामने जिंकता आले आहेत. तर २ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ६६.६६ टक्के इतकी राहिली आहे.







