back to top
शनिवार, सप्टेंबर 27, 2025

ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनच्या सरचिटणीस पदी बाबासाहेब सोनकांबळे तर जिल्हाध्यक्ष पदी रणजित गायकवाड यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उमरगा । सुरज आबाचने । ग्राम संवाद सरपंच असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी बाबासाहेब सोनकांबळे एकोंडी ( ज ) ता. उमरगा यांची तर जिल्हाध्यक्ष पदी रणजित गायकवाड चिंचोली ( भु ) ता. उमरगा यांची दि 19 रोजी निवड करण्यात आली. ग्राम संवाद सरपंच असोसिएशन राज्यातील ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनच्या मार्फत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना त्यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देवून शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याचा मुख्य हेतू आहे. संघटनात्मक वाढीसाठी निवड करण्यात आल्याचे अध्यक्ष अजिनाथ धामणे पाटील यांनी सांगितले. बाबासाहेब सोनकांबळे व रणजित गायकवाड यांच्या निवडीबद्दल त्यांचे उमरगा व परिसरातील ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS