Nath Sampradaya धरणगाव | साक्षीदार न्यूज | नवनाथ मंदिरातील पवित्र मूर्तींच्या विटंबनेच्या घटनेचा तीव्र निषेध करत धरणगावात नाथभक्त आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नाथभक्त परिवाराच्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
मौजे हिंगणा, वैजापूर (ता. शेगाव) येथील नवनाथ मंदिरात अज्ञात समाजविघातकांनी घुसखोरी करून नवनाथ संप्रदायातील अत्यंत पवित्र व पूजनीय असलेल्या नवनाथांच्या मूर्तींची तोडफोड व विटंबना केल्याची गंभीर घटना २७ व २८ जानेवारी २०२६ दरम्यान घडली. या घटनेमुळे नाथभक्तांच्या धार्मिक भावना तीव्र स्वरूपात दुखावल्या गेल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम, कोळपिंप्री (जि. जळगाव) चे अध्यक्ष दिनेश जिजाबराव काटे (प.पू. गुरुवर्य बालकनाथ महाराज) यांच्या नेतृत्वाखाली नाथभक्तांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले. निवेदनात धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक वारसा संरक्षण आणि सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात दोषी आरोपींची तात्काळ ओळख पटवून अटक करावी, प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. सात दिवसांत ठोस प्रगती न झाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने पुढील आंदोलन करण्याचा इशाराही नाथभक्तांनी दिला आहे.
हे निवेदन धरणगाव तहसीलचे निवासी नायब तहसीलदार लक्ष्मणराव सातपुते आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांना देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नाथभक्त उपस्थित होते. “आरोपीला कठोर शासन झालेच पाहिजे” याप्रसंगी सुभाषनाना पाटील, मुरलीधर पाटील, दिलीप पाटील, गणेश सोननी, संतोष महाजन, नरेंद्र (पप्पू) महाजन, विनोद पाटील, मनिष चौधरी, योगेश महाजन, कैलास मराठे, जगन्नाथ भोई, प्रदीप चौधरी, वासुदेव माळी, जितेंद्र पाटील (महाराज), शाम पाटील, देविदास पाटील, गजानन सोनवणे, हितेश धनगर, अंकुश चव्हाण, ललित महाजन, हेमंत महाजन, अविनाश चौधरी, आनंद पाटील (पहेलवान), गणेश निकम, दिपक महाजन, पवन मराठे, दयाराम महाजन, रविंद्र पाटील, कृष्णा महाजन, गणेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव, आकाश कुंवर, दिनेश पाटील, मोहीत पवार, लक्ष्मणराव पाटील, परशुराम पाटील, पंकज महाले, जयेश पाटील, शशिकांत पाटील, आनंद श्रीराम, समाधान महाजन, यशोदीप सोनवणे आदी धरणगाव तालुका व शहरातील नाथभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोपीला कठोर शासन झालंच पाहिजे या मागणीसाठी नाथभक्तांनी दिलेल्या घोषणांनी तहसिल व पोलीस स्टेशनचा परिसर दणाणून निघाला.







