जळगाव ; – आदिवासी टोकरे, महादेव, मल्हार कोळी व इतर आदिवासींच्या न्याय हक्कासाठी दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ वार शुक्रवार रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता सर्वसामान्य जनतेच्या अन्याया विरुद्ध आंदोलन करुन न्याय मिळवून देणारे शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एकवीरा देवी देवपुर धुळे पासून तर मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष पदयात्रा मोर्चा काढण्यात येणार आहे.
आदिवासी टोकरे,महादेव, मल्हार कोळी जमातीच्या लोकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी व येणाऱ्या पुढल पिढीच्या भविष्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून फक्त एक वेळा एकत्र येऊन ह्या १२ दिवसांच्या संघर्ष पदयात्रेत यावे आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण कि आता जर का आपण एकत्र येऊन शासनाविरुध्द लढलो नाही व संघर्ष केला नाही कारण कि आज पर्यंत असा संघर्ष पदयात्रा मोर्चा कोणीच काढला नाही व भविष्यात कोणी काढणार नाही म्हणून आता आपल्याला शानाभाऊ सोनवणे यांच्या रुपात लढाऊ व्यक्ती महत्व व समाजाला एक चांगले नेतृत्व मिळाले आहे म्हणून या १२ दिवसांच्या संघर्ष पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेशभाऊ बाविस्कर, प्रकाश कोळी ( खन्नाभाऊ ) गुलाबराव बाविस्कर, अनिल सैदांणे सर, सरिताताई कोळी ,आत्माराम दोडे, तुषार सैदाणे, ॲड योगेश कोळी अशोक बाविस्कर जिवन तायडे आन्ना कोळी चिः डिगबंर सोनवणे, आबा कोळी, सचिन सपकाळें सह जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचे तरुण तडफदार युवक व कार्यकर्त्यांनी केले आहे








