राज्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष आणि डाळिंब बागांना बसला फटका !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३० नोव्हेबर २०२३

- Advertisement -

राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पंढरपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब बागांना मोठा फटाका बसला आहे. पंढरपूर तालुक्यात ११ हजार एकरावरील द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका बसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात 23 मिलिमीटर इतका पाऊस झाला. या पावसामुळे फ्लोरिंग मध्ये आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष घडात पाणी गेल्याने फळ गळतीचा धोका वाढला आहे. त्याशिवाय भुरी, दावण्या या रोगांचा ही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्याने आज सकाळ पासूनच शेतक-यांनी फवारणी सुरू केली आहे. पंढरपूर तालुक्यात 11 हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पिक घेतले जाते. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS