back to top
शुक्रवार, फेब्रुवारी 6, 2026

Jayant Patel Government ; ‘हाजीर तो वजीर’ : जयंत पाटलांची सरकारवर टीका !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार असून हे अधिवेशन २० तारखेपर्यंत चालणार आहे. त्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली असून निधी वाटपावरुन दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

“सात तारखेपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्याआधी सहा डिसेंबरला महाविकास आघाडीची बैठक घेऊ. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत, ते सोडवले जातील अशी अपेक्षा आहे,” असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. तसेच निधीवाटपावरुन दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. “हाजीर तो वजीर अशी सध्याची सध्या परिस्थिती आहे. जो मंत्रालयात जातो ठाण मांडून बसतो तो जास्त पैसे मिळवतो. सत्ताधारी आमदारांमध्येच ही स्पर्धा असून समान निधीचं वाटप होत नाही. सरकारमधल्या पक्षांमध्येच असमानतेचं धोरण आहे. बाकी विरोधकांचं तर विचारायलाच नको…” असे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patel Government

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS