Nagpur Accident: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात समोर येत असतात आणि त्यातच घटना समोर आली आहे . हि घटना आहे नागपूर जिल्ह्यातील या ठिकाणी भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने एका कारला जोरदार धडक दिल्याने कार मधील एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू झालं आहे . या अपघाताताच्या जागीच अंगाचा थरकाप उडवणारी होती . नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरात शुक्रवारी (१६ डिसेंबर) रात्रीला घडली आहे .
अपघाताची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील परिवार हा नेमका कुठला होता ते अद्याप समोर आलेले नाही.
प्राथामिक माहितीनुसार, मृत व्यक्ती हे काटोल तालुक्यातील (Nagpur News) रहिवासी असल्याचे बोललेलं जात आहे . सर्वजण शुक्रवारी ते नागपूरमध्ये एका लग्नसमारंभासाठी गेले होते . लग्नाचा कार्यक्रम आटोपूण हे सर्वजण कारमधून काटोलच्या दिशेने परत निघाले असतांना हा अपघात झाला . कार सोनखांब आणि ताराबोडीमध्ये मध्यरात्रीला हा अपघात झाला. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. तर्क आणि कारची धडक हि इतकी भीषण होती कि , की कारमधील ६ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व जागेवरची परिस्थिती हाताळत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले . तसेच या अपघात एक इसम हा जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये आले आहे . या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.