back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

अमळनेर तालुक्यात गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार न्युज ; – अमळनेर शहर आणि ग्रामीण भागात सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता अचानकपणे गारपीटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे रब्बी हंगाम देखील हातातून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरासह तालुक्यातील सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपीटीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी आणि काही फळ पिकांच्या बागांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात अमळनेर तालुक्यातील पातोंडा, नांद्री, दहीवद, मुंगसे, सावखेडा, निमगव्हाण खेडी यागावात गारपीटीने झोडपून काढले आहे. यात काही घरांची पडझड देखील झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. प्रशासनाने मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून शेत शिवारात जावून पंचनामा करण्यास सुरूवात केली आहे. शासनाने नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS