back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

शेतकऱ्यांचासाठी महत्वाची बातमी : मंत्रिमंडळात झाले महत्वपूर्ण निर्णय !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | राज्यातील बदलत्या हवामानामुळे अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने हातातोंडाशी आलेलं पिक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. अशात बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्वाचे ८ निर्णय घेण्यात आलेत. नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आलेत.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज, बुधवारी (२९ नोव्हेंबर, २०२३) पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री महोदय उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करून योग्य ती मदत केली जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार मदत दिली जाणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

महत्वाचे ८ निर्णय
१. अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई (मदत व पुनर्वसन) देणार.
२. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात केले जाणार आहे. यामुळे झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळालाय.
३. राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबवले जाणार आहे. त्यानुसार शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश आहे.
४. मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करण्यात येणार आहे.
५. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली जाणार आहे.
६. औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन देण्यात येणारे.
७. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करण्यात येणार आहे.
८. शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिकडचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. सर्व पंचनामे झाल्यावर निर्णय होईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. १८ जिल्ह्यात नुकसान झालं आहे. अजून अंतिम अहवाल येणार आहे. अवकाळीची सर्वात जास्त काळजी स्थानिक आमदाराला असते, असं मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS