TATA-BSNL (sakshidar news ) : – Jio-Airtel रिचार्ज प्लॅनमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर लोक बीएसएनएलकडे वळत असल्याआचे दिसून येत आहे . दरम्यान, टीसीएस आणि बीएसएनएलमधील झालेल्या डीलमुळे खासगी टेलिकॉम कंपन्यांचे चांगलेच टेन्शन वाढले आहे.
एवढेच नाही तर Airtel आणि Jio वापरकर्ते त्यांचे मोबाईल नंबर BSNL वर पोर्ट करत्यांना दिसतआहेत. याशिवाय सोशल मीडियावर याबाबत बरेच ट्रेंडही केले जात आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस आणि बीएसएनएल यांच्यात 15 हजार कोटी रुपयांचा करार झाल्याचीही बातमी आहे.
TCS आणि BSNL मिळून भारतातील 1000 खेड्यांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरू करणार आहेत, जेणेकरून लोकांना येणाऱ्या काळात जलद गतीची इंटरनेट सेवा मिळेल.
Jio-Airtel टेन्शन वाढणार .
सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर, 4G इंटरनेट सेवेवर Jio आणि Airtel यांचेच वर्चस्व आहे, पण BSNL मजबूत झाल्यास Jio आणि Airtel यांच्यातील तणाव वाढू शक्यात नाकारता येत नाही .
टाटा भारतातील चार क्षेत्रांमध्ये डेटा केंद्रे बांधत आहे, ज्यामुळे भारतातील 4G पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत होईल. BSNL ने देशभरात 9000 हून अधिक 4G नेटवर्क सुरु केले आहे , ते जवळपास एक लाखापर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.
Jio-Airtel ने रिचार्ज वाढवण्याची घोषणा केली
जिओने गेल्या महिन्यात जूनमध्ये आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच Airtel आणि Vi ने देखील त्यांच्या योजनांमध्ये वाढ जाहीर केली, जिथे Jio आणि Airtel च्या वाढलेल्या किमती 3 जुलैपासून लागू झाल्या आहेत. त्यामुळे VI च्या वाढलेल्या किमती 4 जुलैपासून लागू झाल्या आहेत.
जिओने सर्वात जास्त किंमत वाढवली आहे. कंपनीने एकाच वेळी थेट 12 ते 25 टक्क्यांनी किमती वाढवल्या आहेत. तर Airtel ने 11 ते 21 टक्के आणि Vi ने 10 ते 21 टक्क्यांनी किमती वाढवल्या आहेत. जिओबाबत सोशल मीडियावर लोकांचा सर्वाधिक राग व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लोक आता बीएसएनएलकडे वळू लागले आहेत.एकत्र आल्याने







