त्यांना’ यावेळी असे पाडा की ते पुन्हा कधीच उठणार नाही

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

शिवसेना नेते शरद कोळी यांची भोकरच्या सभेत गर्जना

- Advertisement -

जळगाव (सुनिल भोळे) : – जात प्रमाणपत्रासाठी कोळी समाज बांधवांनी जळगाव शहरात तब्बल २० दिवस आमरण उपोषण करून न्याय मागितला होता. त्यावेळी तुमचे आमदार झोपा काढत होते का, असा सवाल उपस्थित करून ‘त्यांना’ यावेळी असे पाडा की ते पुन्हा कधीच उठणार नाही, अशी गर्जना शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केली.

 

- Advertisement -

महाविकास आघाडीचे जळगाव ग्रामीणमधील उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ भोकर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना उद्धव सेनेचे फायर ब्रॅन्ड नेते शरद कोळी यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. पालकमंत्र्यांवर देखील त्यांनी निशाणा साधला. ज्याच्याकडे कधीकाळी साधी मोटारसायकल नव्हती, त्याच्याकडे करोडोंची संपत्ती कुठुन आली. जळगाव ग्रामीणच्या विकासासाठी निधी आणला म्हणतात, मग विकास गेला कुठे. या मतदारसंघाला कीड लागली आहे. हाताला काम नसल्याने तरूण व्यसनाधीन झाले आहेत. तुम्ही गुलाबराव देवकरांना आमदार करा, आम्ही त्यांना मंत्री करू आणि जळगाव ग्रामीणमधील आताच्या मंत्र्यांनी केलेल्या कारनाम्यांची चौकशी लावू. त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करू, असाही इशारा शरद कोळी यांनी भोकर येथील सभेत बोलताना दिला.

भोकरच्या पुलाचे उद्घाटन मीच करणार : गुलाबराव देवकर
तापी नदीवरील भोकर-खेडीभोकरी दरम्यानच्या पुलाचे काम गेल्या दोन पंचवार्षिकपासून रखडले आहे. हा पूल आम्हीच पूर्ण करू आणि त्याचे उद्घाटन देखील आम्हीच करू, असे माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले. जळगाव ग्रामीण मतदारसंघ १० वर्षात पिछाडीवर पडला आहे. कोळी समाजाला प्रत्येक निवडणुकीत जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, पुढे काहीच हालचाल झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, लक्ष्मण पाटील (लकी टेलर), शिंदे सेनेचे तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, किसान सेलचे रवींद्र पाटील, भोकरचे माजी सरपंच हरीश पवार आदी उपस्थित होते. लक्ष्मण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS