साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | जळगाव तालुक्यातील एका गावातील मालकाच्या मृत्यूनंतर भाडेतत्त्वावर दिलेल्या बँडचे तब्बल ७ लाख ७५ हजार रुपये भाडे दिले नाही म्हणून पाच जणांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर कंडारी येथील किरण संपत यांचा विवाह सोहळा व इतर शुभा कार्यामध्ये बैंड वाजविण्याचा व्यवसाया होता. त्यांचे निधन झाल्यानंतर सदर बँड साहित्य रायपूर येथेच भाडेतत्त्वाव देण्यात आले. मात्र, जून २०२० पासून या बँड साहित्याचे भाडे मिळत नसल्याने किरण यांच्या कुटुंबीयांनी संबंधितांकडे वारंवार मागणी केली. ही रक्कम मिळत नसल्याने मयताचे नातेवाइक रवींद्र दगडू धनगर (३२) यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राजू शेख बाबू पटेल (५२), जाकीर शेख युनूस (३४) – आरिफ शेख युनूस शेख (३२), भैया बाबू पटेल (३५), ताहीर राजू पटेल (१९ सर्व रा. रायपूर, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार रवींद्र तायडे करीत आहेत.