साक्षीदार | १६ नोव्हेबर २०२३ | राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्यभर दौऱ्याची सुरुवात केली असून मनोज जरांगे यांच्या सभेसाठा काल दुपारपासून मराठा समाज हजारोंच्या संख्येने जमायला सुरूवात झाली होती.
अनेक भागातून मराठा बांधव जमायला सुरूवात झाली होती. करमाळा येथील वांगी हे गाव उजनीच्या बॅक वॉटर वरती आहे. कडाक्याची थंडी या भागामध्ये जाणवते. इंदापुर येथील लोकही या सभेसाठी पोहोचले होते. सभेसाठी लाखाच्या आसपास लोक जमले होते. मात्र, जरांगे यांना पोहोचण्यासाठी उशीर झाला. ते पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोहोचले.
त्यांना पोहोचायला उशीर झाला मात्र, येथे जमलेल्यांनी मनोज जरांगे यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर ४ वाजता सभा पार पडली. ४ ते ५ मिनीटे ते सभेत बोलले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा ही करमाळ्याची सभा कायम लक्षात राहिलं. तुमचं जे प्रेम आहे, ऋण आहे ते हा मराठा समाज कधीही विसरणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.