Maratha Reservation Movement ; मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची नवी दिशा ठरली !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २२ ऑक्टोबर २०२३ | दोन दिवसावर आता मराठा आरक्षणबाबत राज्य सरकारला दिलेला वेळ संपत असल्याने आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पुढील दिशा ठरवलेली आहे. आपल्या लढ्याची नवी दिशा निश्चित केली असून 24 तारखेला न्याय न मिळाल्यास 25 ऑक्टोंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. या उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक नाक्यावर साखळी उपोषण करणार असून हे युद्ध सरकारला पेलणार नाही. असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

- Advertisement -

24 तारखेला जर न्याय मिळाला नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तर राज्यभर साखळी उपोषण करणार असून प्रत्येक नाक्यावर उपोषण होईल अशी माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, 28 तारखेपासून आमरण उपोषणाचे रुपातंर हे आमरण उपोषणात करण्यात येईल अशी रणनिती जरांगे पाटलांनी सांगितली आहे. शांततेत सुरू होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही, या विषयाची तुम्ही गांभीर्याने दखल घ्या, आणि 24 तारखेपर्यंत आरक्षण लागू करावे अशी मागणी यावेळी बोलताना त्यांनी केली आहे.

Maratha Reservation Movement

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS