आता सरकारला एक तास ही देणार नाही ; मनोज जरांगे पाटील !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २४ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे नाव राज्यभर चर्चेत येत आहे. त्यांनी सरकारला दिलेली मुदत संपत आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा अनेक भागात दौरे देखील सुरु आहे. नुकतेच अहमदनगरच्या चौंडी येथे धनगर समाजाकडून इशारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मराठा आरक्षणाचे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली.

- Advertisement -

चौंडी येथील अहिल्या देवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असे म्हणत सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नसल्याचा इशारा दिला आहे. जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अहिल्या देवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन या सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना केली. या सरकारने आजपर्यंत आमचा उपयोग करून घेतला. यांचा मानसन्मान आम्ही वाढवला. मात्र आता आमच्या लेकरांचा मानसन्मान वाढवण्याची वेळ आलीये मात्र आता हेच आमच्याविरोधात दंड थोपटायला लागलेत. मात्र आता आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय मागे हटणार नाही.’ तसंच,’सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नाही. विश्वासाहर्ता गमवायची नसेल तर सरकार आरक्षण देईल. आता धनगर आणि मराठा एकत्रित लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. मराठा समजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे-पाटील यांचे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांनी आंदोलन आणि उपोषण केले. जरांगे-पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी आज संध्याकाळपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने आज संध्याकाळपर्यंत आरक्षण दिलं नाही तर त्यांनी आमच्या दारातही यायचं नाही. आरक्षण देणार असेल तरच चर्चा करू. अन्यथा चर्चा नाही. एक तासही वेळ सरकारला देणार नसल्याचे, जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS