back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

Ration Card | जानेवारी 2026 पासून रेशनमध्ये मोठा बदल! अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना किती धान्य मिळणार ? वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ration Card | साक्षीदार न्यूज | नवीन वर्षाची सुरुवात होताच रेशन व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. जानेवारी 2026 पासून राज्यासह देशभरातील कोट्यवधी शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात फेरबदल लागू होणार असून, याचा थेट परिणाम अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांवर होणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत हा बदल करण्यात येत असून, गरीब, गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी असलेल्या रेशन वाटपाच्या प्रमाणात पुन्हा एकदा सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे कोणाच्या वाट्यात धान्य वाढणार आणि कोणाला कमी मिळणार, याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना किती धान्य मिळणार?

- Advertisement -

जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या नव्या नियोजनानुसार, अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना प्रती कार्ड 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू दिला जाणार आहे.
तर प्राधान्य कुटुंब योजना (PHH) अंतर्गत प्रत्येक सदस्याला दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू मिळणार आहे.

कधीपासून लागू होणार?

हे सुधारित धान्य वाटपाचे प्रमाण जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. मात्र डिसेंबर 2025 या महिन्यासाठी सध्या सुरू असलेलेच रेशनचे प्रमाण कायम राहणार आहे.

कोणत्या भागात होणार अंमलबजावणी?

हा बदल देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू केला जाणार आहे. महाराष्ट्रातही सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत सर्व रेशन दुकानांमार्फत या नव्या नियोजनाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

हा बदल का करण्यात आला?

अन्नधान्याचा समतोल राखणे आणि वितरण व्यवस्थेत एकसमानता आणणे, हा या बदलामागचा मुख्य उद्देश आहे. काही काळापूर्वी पुरवठा विभागाने अंत्योदय लाभार्थ्यांना 25 किलो तांदूळ व 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना 4 किलो तांदूळ व 1 किलो गहू देण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा मूळ नियोजनाकडे वळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंमलबजावणी कशी होणार?

पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार रेशन दुकानदारांना सुधारित प्रमाणानुसार धान्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. ई-पॉस मशीन, आधार प्रमाणीकरण आणि डिजिटल नोंदीद्वारे या बदलांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या शिधापत्रिकेच्या प्रकारानुसार निश्चित प्रमाणात तांदूळ आणि गहू मिळेल.

दरम्यान, डिसेंबर 2025 मध्ये कोणताही बदल नसल्याने, त्या महिन्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 25 किलो तांदूळ व 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 4 किलो तांदूळ व 1 किलो गहू याच प्रमाणात रेशन दिले जाणार आहे. मात्र जानेवारीपासून लागू होणाऱ्या नव्या व्यवस्थेमुळे लाभार्थ्यांनी धान्याच्या बदललेल्या प्रमाणाची माहिती ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

rohit pawar firing | थरारक घटना! रोहित पवारवर हॉटेलमध्ये गोळीबार, एक आरोपी ताब्यात
Jalgaon Education Scam | बिग ब्रेकिंग । जळगाव भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षकाचे निलंबन किंवा डिमोशन
Pune Jalgaon Expressway | पुणे ते जळगाव अवघ्या ३ तासांत? नव्या…

Ration Card

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS