school nutrition meal scheme | साक्षीदार न्यूज | राज्यातील शालेय पोषण आहार योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात बोलताना या योजनेत सुमारे १८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला.
पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या साहित्याच्या खरेदी व वितरण प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. टेंडरमध्ये हिरवा वाटाणा पुरवण्याची अट नमूद असताना प्रत्यक्षात पांढरा वाटाणा देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लहान मुलांच्या पोषणाशी थेट संबंधित असलेल्या या योजनेतच गैरप्रकार झाल्याचा आरोप झाल्याने सभागृहात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.
दरम्यान, या गंभीर आरोपांवर राज्य सरकार काय भूमिका घेते, चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या शालेय पोषण आहार योजनेबाबत पुढील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
Municipal elections | २९ महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात? राज्यात आचारसंहिता लागू होणार?
Mahindra New SUV Launch | महिंद्राची नवी धमाका एंट्री! XUV 7XO चे नाव जाहीर; 5 जानेवारीला उघड होणार ‘उद्याची SUV’
school nutrition meal scheme







