खळबळजनक : रेल्वेतील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | देशभरातील अनेक राज्यात धक्कादायक घटना घडत असतांना अशीच एक घटना रेल्वे प्रवासातून समोर आली आहे. चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव यात्रा रेल्वेमधील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घली असून सर्व प्रवाशांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान विषबाधा झालेल्या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान या विषबाधेच्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून पुण्याकडे येणारी ही रेल्वे मध्यरात्री पुणे रेल्वे स्टेशनला पोहचली. तेव्हा रेल्वेमधील काही प्रवाशांना अचानक उलट्या तसेच मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरच त्यांच्यावर प्राथामिक उपचार करण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रेल्वेमध्ये सध्या पेन्ट्री कार काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र काही रेल्वेगाड्यांमध्ये खानपानाची सोय देण्यात आली आहे. अनेकदा सकाळी पॅक केलेल अन्न सायंकाळी, रात्री देण्यात येते त्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS