Acident ; भरधाव कारची सहा वाहनांना धडक : ३ ठार तर सहा जखमी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १० नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची घटना नियमित सुरु असतांना आता मुंबईतून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गुरुवारी एका भरधाव कारने सहा वाहनांना धडक दिल्याने तीन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल प्लाझा जवळ घडली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा देखील समावेश असून जखमींपैकी दोघे अत्यावस्थ आहेत.

- Advertisement -

सी लिंकवरील टोल प्लाझाच्या अवघ्या 100 मीटर आधी हा अपघात झाला. एका इनोव्हा गाडीने मर्सिडीज कारला धडक दिली. त्यानंतर पळून जात असताना टोल नाक्यावर थांबलेल्या वाहनांना ईनोव्हा कारने उडवले. या अपघातात ईनोव्हा गाडीतील तिघांचा मृत्यू झाला आहे.अपघातात चालक देखील जखमी झाला असून चालकासह अन्य चौघांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाला लिलावती रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर चालकाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाणार आहे. सुरुवातीच्या धडकेनंतर कारचा वेग वाढला आणि टोलनाक्यावरील आणखी वाहनांना धडक देण्यात आली अशी माहिती समोर आली आहे.

 Acident

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS