back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Sudhir Mungantiwar | ‘प्रमोशनसाठी सरकार टिकावे लागेल’, मुनगंटीवारांचे वक्तव्य चर्चेत; काँग्रेस-ठाकरे गटावर टोला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sudhir Mungantiwar साक्षीदार न्युज । नाशिक । भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज एका व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. मुनगंटीवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना “प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे,” असा खोचक उल्लेख केला, ज्यामुळे राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांचा उल्लेख करत अप्रत्यक्ष टोला लगावला, ज्याने या वक्तव्याला आणखी वजन प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

या व्याख्यानमालेच्या आयोजनादरम्यान आयोजकांनी मुनगंटीवार यांना सांगितले की, या कार्यक्रमाला येणाऱ्यांचे प्रमोशन होते, उल्लेखाने गेल्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीचा दाखला दिला. या संदर्भातून आयोजकांचा हेतू मुनगंटीवार यांचे लवकरच मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचे सूचित करणे असावा. मात्र, मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सावध पवित्रा घेतला. त्यांनी म्हटले, “जेव्हा मला हे ऐकले की येथे येणाऱ्यांचे प्रमोशन होते, तेव्हा माझ्या मनात शंका निर्माण झाली. प्रमोशनसाठी सरकारची स्थिरता आवश्यक आहे, आणि माझ्यासाठी तितकेच खरे आहे की उद्या आणि परवा येणाऱ्या वक्त्यांसाठी (प्रणिती शिंदे आणि अरविंद सावंत) सरकारमध्ये बदल होणे गरजेचे आहे. जर सर्वांना प्रमोशन द्यायचे असेल, तर त्यांना पक्षात सामील करावे लागेल.”

मुनगंटीवार हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना यापूर्वीच त्यांनी फेटे दिले होते. तरीही, त्यांची ही विधाने महायुती सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे मानले जात आहे. विशेषतः शेतकरी प्रश्नांवर सरकारला घरचा आहेर देणाऱ्या मुनगंटीवार यांनी आता विरोधी पक्षातील नेत्यांचा उल्लेख करत अप्रत्यक्ष टीका केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यामुळे मुनगंटीवार यांचा पुढील राजकीय डाव काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, तर काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 

सासूला पळवून नेणाऱ्या जावयाचा सासऱ्याला निरोप: “२० वर्षे झाली, आता तिला विसरून जा”
धक्कादायक ! 30 महिन्यांत 25 प्रसूती आणि 5 नसबंदी; तरीही गर्भवती, आरोग्य घोटाळा
जळगांवच्या नागरिकांच्या डोळ्यात आले अचानक पाणी

Sudhir Mungantiwar

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS