Telangana Municipal Election | साक्षीदार न्यूज | ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने केली जात असताना कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बंगळुरू महापालिकेसह जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आता बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर तेलंगणामधील 116 नगरपालिका आणि 7 महानगरपालिकांतील एकूण 2,996 वॉर्डांसाठी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान पार पडले. या निवडणुकांचे निकाल अत्यंत धक्कादायक ठरले असून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे भाजपला मोठा फटका बसल्याचे चित्र दिसून आले आहे.
तेलंगणात काँग्रेसचा प्रभाव कायम
तेलंगणातील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने 1,537 प्रभाग जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल काँग्रेससाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
ए. रेवंत रेड्डी यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, राज्य सरकार प्रत्येक नगरपालिका आणि महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध आहे आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय दिला जाईल.
इतर पक्षांची कामगिरी
या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती (BRS) ने 781 प्रभागांमध्ये विजय मिळवला.
भारतीय जनता पक्ष (भाजप) ला 336 प्रभागांवर समाधान मानावे लागले.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने 70 प्रभाग जिंकले.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) (CPI-M) ला 13 प्रभाग मिळाले.
इतर पक्षांना 73 तर अपक्ष उमेदवारांना 183 प्रभागांमध्ये यश मिळाले.
एकूण निकाल (प्रभागनिहाय)
-
काँग्रेस: 1,537
-
BRS: 781
-
भाजप: 336
-
AIMIM: 70
-
CPI (मार्क्सवादी): 13
-
इतर: 73
-
अपक्ष: 183
तेलंगणात दोन वर्षांपूर्वी सत्तेत परतलेल्या काँग्रेसने या निकालांद्वारे आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
“लाच प्रकरणानंतर 24 तासातच जळगावात वाळू माफियांचा कहर! 57 वर्षीय नागरिकाचा डंपरखाली







