एक्स्प्रेसची भीषण धडक ; पतीसमोर पत्नीसह दोन मुली ठार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३ | देशातील अनेक मोठ्या शहरात वंदे भारत एक्स्प्रेस धावत असतांना याच रेल्वेने एका परिवारातील तीन जणांना ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिवाराला रेल्वेचे फाटक बंद असताना रूळ ओलांडणे चांगलेच महागात पडले आहे. हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मेरठ येथील कंकरखेडा विभागातील कासमपूर रेल्वे फाटकाजवळ ही दुर्घटना घडली. दिल्लीहून सहारनपूरकडे वंदे भारत एक्स्प्रेस जात होती. कासमपूर फाटकावर नरेश हा आपल्या कुटुंबासह रेल्वे रूळ ओलांडत होता. त्याचवेळी वंदे भारत एक्स्प्रेसची त्यांना धडक लागली. यात महिलेसह तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. मोना असं मृत महिलेचे नाव आहे. तर चारू आणि इशिका अशी मुलींची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलीस आणि लोहमार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लोकांच्या मदतीने रेल्वे रुळांवरून त्यांचे मृतदेह उचलले. ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

या दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महिला आणि तिच्या दोन मुलींचा वंदे भारत एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. एक्स्प्रेस येणार असल्याने रेल्वे फाटक बंद होते. तिघेही फाटकातून रेल्वे रूळ ओलांडून जात होते. त्याचवेळी एक्स्प्रेस आली आणि ही दुर्घटना घडली. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS