साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही महिन्यापासून मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमक्या येत आहेत. त्यातच आता याच विमानतळावर एका प्रवाशाने मोठा गोंधळ घातलाय. तरुणाने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा देखील केला आहे. आकाशात उडत असलेल्या विमानात बॉम्ब असल्याचं समजताच इतर प्रवाशांची धांदळ उडाली. आपला जीव वाचवण्यासाठी सर्वजन पळापळ करू लागले. शेवटी विमान उतरल्यावर सत्य समोर आले आहे.
दि.२० रोजी शुक्रवारी अकासा एअरलाइन्सचे विमान पुण्याहून दिल्लीतकडे जाणारे विमान मध्येच मुंबईला थांबवण्यात आले. या विमानात एका प्रवाशाने मोठा गोंधळ घातला. माझ्या जवळ असलेल्या बॅगेत एक बॉम्ब आहे असं तो तरुण ओरडत होता. विमान थांबवा मला खाली उतरू द्या अशी ओरड त्याने लावली होती. बॅगेत बॉम्ब असल्याचा प्रवाशाने दावा करताच मुंबई विमानतळावर गोंधळ झाला. विमान तात्काळ उतरवण्यात आले. पुढे बीडीडीएस मार्फत त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. तपासणीत ही अफवा असल्याच स्पष्ट झालं आहे. पुढे तपासात तरुणाच्या मित्राने सांगितले की, त्याची तब्येत ठिक नसल्याने तो अशापद्धतीने ओरडत होता. विमानातून उतरल्यावर तरुणावर योग्य तो औषधोपचार करण्यात आला. तरुणाजळ कोणताही बॉम्ब आढळलेला नाही. मात्र त्याने उडवलेल्या अफवेमुळे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.








